मुंबईतून गावी पोहोचलेल्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ६ दिवस घरातच ठेवला मृतदेह

मुंबई : 
सातारा-म्हाते खृर्द जावली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतून आलेल्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यी झाला. मात्र कुटुंबियांनी तब्बल ६ दिवस हा मृतदेह राहत्या घरीच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 
२७ मार्च रोजी कोरोनाचा पार्श्वभूमीवर १५ वर्षीय मुलासह मुंबईतून गावी आले होते. हा मुलगा गेल्या सात-आठ महिन्यांपासून आजारी होता. मुंबईहून येऊन दीड महिना झाल्यानंतर मुलाचा घरातच मृत्यू झाला. मात्र कुटुबियांनी ही बाब लपवून ठेवली. याबाबतची कोणतीही माहिती पोलिसांना अथवा गावकऱ्यांनी दिली नाही. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजारच्या लोकांनी घरात जाऊन पाहिले. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.